३० जून वार्ता: राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस होणार आहे. काही भागांत अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने काही भागांत यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आधी बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला रोखून धरले होते. परंतु वादळ शांत होताच आता मान्सूनने चांगल्या प्रकारे सुरु झाला आहे.