Home स्टोरी कोमसापच्या २२ मार्च रोजी होणाऱ्या संमेलनाची नियोजन आढावा बैठक संपन्न.

कोमसापच्या २२ मार्च रोजी होणाऱ्या संमेलनाची नियोजन आढावा बैठक संपन्न.

59

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी शाखेच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय साहित्य संमेलन शनिवारी २२ मार्च रोजी. सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै  सभागृहात सकाळी ९:३० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक दिवसीय संमेलन होत आहे. या संमेलनासाठी खास पद्मश्री कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दर्जेदार साहित्याची मेजवानी असणारे सावंतवाडी संस्थानकालीन शहरात हे संमेलन होत आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी असे या साहित्य संमेलनाला नाव देण्यात आले आहे. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, आयोजन तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. सावंतवाडी येथे या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखक साहित्यिक कवी ग्रंथालय तसेच सर्व स्तरातील व्यक्तीं यांनी या संमेलन मध्ये सहभागी व्हावे यासाठी व कार्यक्रम नियोजनासाठी सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे साहित्य संमेलन संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. असे त्याने स्पष्ट केले. भव्य दिव्य असे हे साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या नियोजन आढावा बैठकीसाठी कार्याध्यक्ष श्री ढवळ आले होते. यावेळी पर्णकुटी विश्रामगृहावर घेतलेला पत्रकार परिषदेत त्यांनी येथे आठवड्याभरात होणाऱ्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाची रूपरेषा स्पष्ट केली.

श्री ढवळ पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संस्कृती फार मोठी आहे. या जिल्ह्याने अनेक साहित्यिक लेखक घडवले आहेत. ही साहित्य चळवळ पुढे अविरत चालू ठेवण्याच्या दृष्टीने कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेत आहे. या संमेलनाचे यजमानपद सावंतवाडी शाखेला देण्यात आले आहे. सावंतवाडी शाखेचे काम उत्तम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद साहित्य चळवळ व्यापकतेने चालवत आहे. सर्व तालुक्यात मालवण, कुडाळ, कणकवली या तालुक्यातही साहित्यिक घडवण्याचे काम त्या त्या शाखा करत आहेत. असे ते म्हणाले.

शनिवारी २२ मार्चला एक दिवसीय साहित्य संमेलन होणार आहे.या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागत अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दिपक केसरकर, संमेलन अध्यक्ष वस्त्रहरणकार प्रा. गंगाराम गवाणकर तर विशेष उपस्थिती पद्मश्री संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सौ नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर आदींच्या उपस्थितीत साहित्य संमेलन रंगणार आहे.

ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, लेखक मुलाखत, साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त परिसंवाद, कवी वसंत सावंत यांच्या स्मरणार्थ कवी संमेलन, समारोप असे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना पुणे येथे झालेल्या विश्व साहित्य परिषदेमध्ये त्यांना विश्वसाहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. तरी या साहित्य संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित लेखक साहित्यिक यांनी लिहिलेले साहित्य या संमेलनात प्रकाशन केले जाणार आहे. हे साहित्य संमेलन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीला एक नवी दिशा देणारे ठरणार आहे. तरी या साहित्य संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य सांस्कृतिक चळवळीतील संस्था शिक्षक शाळा महाविद्यालय लेखक कवी साहित्यिक आधी सर्व घटकातील व्यक्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन श्री म्हस्के यांनी केले. आहे.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद च्या केंद्रीय सदस्य सौ उषा परब, इतिहासकार प्राध्यापक जी. ए. बुवा, कुडाळ तालुकाध्यक्ष सौ. वृंदा कांबळी, जिल्हा खजिनदार भरत गावडे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, सह सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर, सदस्य एडवोकेट नकुल पार्सेकर, दिपक पटेकर, प्राध्यापक रुपेश पाटील, विनायक गावस आधी उपस्थित होते.