१८ मे वार्ता: भारत स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पण खरंच आपल्या देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आपल्या देशामध्ये सर्वतोपरी विकास झाला आहे का? याला नेमका जबाबदार कोण? नेमका कोणता राजकीय पक्ष जबाबदार आहे? देशातील सर्वसामान्य जनता सुखी आहे का? देशातील बेरोजगारी संपली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात सत्तेत असलेल्या काही राजकीय नेत्यांकडे च्या अनेक पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे ती आली कुठून? हे सर्व हे काही नेते भ्रष्ट आहेत का? काही राजकीय नेते देशाला विकासाकडे नेत आहेत की भ्रष्टाचार करत करोडपती झाले आहेत? असे अनेक प्रश्न भारत स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही उपस्थित होतात ते म्हणजे देशात अनेक व्यक्तींच्या असलेल्या दुरावस्थेमुळे होय.
अशीच एक घटना केशवाहीतील कोटा गावात राहणारे लक्ष्मण सिंह यांच्याबाबतीत घडली. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत. केशवाहीतील कोटा गावात राहणारे लक्ष्मण सिंह यांची मुलगी माधुरी सिकलसेल या आजाराने ग्रासलेली होती. माधुरीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान माधुरचा मृत्यू झाला. यानंतर माधुरीच्या पालकांनी माधुरीचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली होती. परंतु, रुग्णवाहिका ही १५ किलोमीटर अंतरापर्यंत मिळू शकते, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. या पीडित लक्ष्मण यांचे गाव रुग्णालयापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी वाहनाची व्यवस्था करण्यास सांगितले. परंतु, लक्ष्मण यांच्याकडे खासगी वाहनाला देण्याऐवढे पैसे नव्हते. यानतंर लक्ष्मण आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुचाकीवरून मुलीचा मृतदेह गावी नेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मुलीचा मृतदेह दुचाकीवर ठेवल्यानंतर गावाच्या दिशने निघाले असताना. जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर वेळीच त्यांनी पीडित पालकांना थांबविले आणि मुलीचा मृतदेह गावी नेण्यासाठी वाहनाची सोय केली आणि आर्थिक मदतहि केली. तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.