Home राजकारण भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच! अजित पवार

भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच! अजित पवार

93

विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपात जाणार, अशा चर्चा रंगल्या असताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचं कौतुक केलं आहे.भाजपचा करिष्मा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पसरवला, अशा शब्दांत त्यांनी मोदी यांचं कौतुक केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाच्यावतीने अजित पवार यांची ‘दिलखुलास दादा’ ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी राज्यातील आघाडी आणि भाजपच्या कार्यशैलीसंदर्भात भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, २०१४ मध्ये पहिल्यांदाच बहुमताने भाजप निवडून आला. २०१४ आणि २०१९ मध्ये एकहाती सत्ता घेणारा पक्ष हा भाजपच होता. या काळात नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजप सर्वदूर पोहचला. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा हा देशात चालला आणि त्यांनी देशातील करोडो जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांची भाषणंदेखील गाजली. भाषणं करत असताना त्यांनी जनतेला आपलंसं केलं होतं. त्यानंतर जनतेला वाटलं की आपण नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाचे सूत्रं द्यावीत आणि जनतेनेही मतांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचे सूत्रं दिली, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. यापूर्वी ‘हे’ कोणालाही जमलं नाही.

अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं सर्वसमावेशक नेतृत्व भाजपमध्ये होतं. त्यासोबतच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे सगळे एकेकाळी भाजपच वाढवण्याचं कार्य करत होते. त्यावेळी या सगळ्यांना जे जमलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं. १९८४ नंतर पहिल्यांदा २०१४ मध्ये पूर्ण बहूमत असणारं सरकार अस्तित्वात आलं. १९८४ नंतर कधीही भारतात पूर्ण बहूमत कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. मात्र हे एकहाती सत्ता नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली. त्यांनी केलेला हा करिष्मा आपल्याला नाकारता येऊ शकत नसल्याचं ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली. सगळ्यांनी देशाचं हित कशात आहे हे बघायला हवं. देशाचं भलं कशात आहे हे पाहिलं पाहिजे आणि भारताला पुढे नेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.