सावंतवाडी प्रतिनिधी: आताच्या जोरदार पावसामुळे तलावाच्या काठावर लावलेले बॅनर रस्त्यावर पडले. अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी ते रस्त्यावर पडलेले बॅनर उचलून बाजूला ठेवले. संबंधित बॅनर मालकांनी रस्त्यावर पडलेल्या बॅनरला अडकून कोणाचा अपघात होऊ नये. याची योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.







