Home स्टोरी पाळीव जनावरांची वाहतूक करतांना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक.

पाळीव जनावरांची वाहतूक करतांना शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक.

210

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाळीव जनावरे गाई, म्हशी, बैल यांची वाहतूक करताना शेतकऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या विरोधात सर्व शेतकरी बांधव एकवटले आहेत. आम्ही आमच्या स्वतःच्या गाई म्हशी जनावरे यांची खरेदी विक्री व्यवहार करत आहोत. असे असताना आमच्यावर काही संघटना दबाव आणत आहेत आणि त्या रोखत आहेत तसेच पोलीस कारवाई करत आहेत. ही कारवाई तात्काळ हटवावी. यासाठी २६ जूनला आंदोलन जिल्ह्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला होता. आज या सर्व शेतकरी बांधवांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट घेतली. याविषयी परब यांनी आपण या प्रश्नाचे लक्ष झाले तुम्ही काळजी करू नका. बिनधास्तपणे राहा. आश्वासन दिले त्यामुळे २६ जून रोजी होणाऱ्या आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बाळकृष्ण सामंत, प्रसाद परब,  जयदीप गवस, गुणाजी दळवी, संदीप दळवी,, राजकुमार राऊळ आधी उपस्थित होते. गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेषता सावंतवाडी तालुक्यात काही हिंदू संघटना एकत्र येत गाई म्हशी पाळीव जनावरे यांची वाहतूक करत असताना शेतकऱ्यांच्या गाड्या अडवत आहेत आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई करायला भाग पडत आहेत. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. या हिंदू संघटनांनी असे करणे चुकीचे आहे. आम्ही पण या हिंदू संघटनांच्या बाजूने आहोत. जर एखादे जनावर वेगळ्या कामासाठी दिले गेले असेल. तर निश्चित आम्ही ते रोखू पण आम्ही सर्व शेतकरी आमच्या पोटापाण्याच्या साठी हे करत असताना आणि आमचा हा व्यवसाय असताना आमच्यावर कारवाई का? असा सवाल यावेळी श्री सामंत यांनी केला.

जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या शेतकऱ्यांना धीर देत तुम्ही तुमचे काम करा.  तुम्हाला कोणी अडवणार नाही. जर कोणी अडवत असेल तर निश्चित आम्ही लक्ष घालू. तुम्ही बिनधास्त रहा असे त्यांनी आश्वासन दिले.