Home स्टोरी मराठा क्रांती मोर्चा’वर लाठीमार केल्‍याच्‍या प्रकरणामुळे पुणे येथून मराठवाड्याकडे जाणार्‍या ६०० पेक्षा...

मराठा क्रांती मोर्चा’वर लाठीमार केल्‍याच्‍या प्रकरणामुळे पुणे येथून मराठवाड्याकडे जाणार्‍या ६०० पेक्षा अधिक बसगाड्या रहित !

163

५ सप्टेंबर वार्ता: ‘मराठा क्रांती मोर्चा’वर लाठीमार केल्‍याच्‍या प्रकरणामुळे केल्‍याच्‍या प्रकरणामुळे पुणे येथून मराठवाड्याकडे जाणार्‍या ६०० पेक्षा अधिक बसगाड्या रहित केल्या आहेत. या बसगाड्या पुन्‍हा कधी चालू होतील ? याविषयी कोणतीही अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून मिळत नाही. यवतमाळ जिल्‍ह्यातून नांदेड, पुणे, संभाजीनगरसह मराठवाड्याकडे जाणार्‍या १६ गाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत. संभाजीनगरहून मराठवाड्यातील इतर जिल्‍ह्यांत जाणार्‍या बसगाड्या सध्‍यातरी पूर्णपणे बंद करण्‍यात आल्‍या आहेत.

जालन्‍यातील आंदोलनामुळे एस्.टी. महामंडळाचे ४६ आगार पूर्णत: बंद !

८ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न आणि २ कोटी ६० लाख रुपये महसूल बुडाला आंदोलनामुळे गेल्‍या ३ दिवसांत एस्.टी.च्‍या २५० आगारांमधील ४६ आगार पूर्णत: बंद आहेत. प्रामुख्‍याने अहिल्‍यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि धाराशिव या जिल्‍ह्यांमध्‍ये बंदचा प्रभाव अधिक आहे. मागील ३ दिवसांमध्‍ये आंदोलनकर्त्‍यांकडून एस्.टी. च्‍या २० बसगाड्या जाळण्‍यात आल्‍या, तसेच १९ बसगाड्यांची तोडफोड करण्‍यात आली. यामुळे अनुमाने ५ कोटी २५ लाख रुपयांची हानी झाली आहे, तर बंद असलेल्‍या आगारांमुळे अन् आगारातील अंशतः रहित केलेल्‍या फेर्‍यांमुळे एस्.टी. महामंडळाच्‍या तिकीट उत्‍पन्‍नातील ८ कोटी रुपयांचे उत्‍पन्‍न बुडाले आहे. एस्.टी. बसगाड्यांच्‍या एकूण फेर्‍यांतील अनुमाने ६ सहस्र २०० फेर्‍या रहित करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे २ कोटी ६० लाख रुपयांचा महसूलही बुडाला आहे. जालना येथे शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करणार्‍या, उपोषणास बसलेल्‍या सकल मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात असंख्‍य कार्यकर्ते घायाळ झाले. याचा सकल हिंदु समाज तीव्र निषेध करत आहे. लाठी आक्रमणाचा आदेश देणारे अधिकारी, राजकीय नेते यांची चौकशी होऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई व्‍हावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्‍या वतीने जिल्‍हा प्रशासनास देण्‍यात आले. मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍यांवर लाठीमार करण्‍याचा आदेश मंत्रालयातून देण्‍यात आलेला नाही, असे स्‍पष्‍टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.