Home राजकारण जळगावमध्ये झालेल्या राड्याबाबत गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

जळगावमध्ये झालेल्या राड्याबाबत गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

63

जळगाव: खासदार संजय राऊत जळगावमध्ये पोहचताच राडा तेथे झाला. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?…. “संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं. आर ओ तात्या हे आमचे दैवत आहेत. पण राऊतांनी चौकटीत बोलावं. संजय राऊत जास्त बोलत असतील, आमच्या मतावर मातलेला हा बोक्या जास्त उडत असेल तर त्यांनी सावधानतेने राहावं. मी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. एकही शब्द वाकडंतिकडं बोलला तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाता जाऊन दाखवावं”, संजय राऊत यांनी जळगावात दाखल झाल्यानंतर जळगावात घुसलो. “तुमचा एक माणूस तिथे गेलेला दाखवा. इथे माझे सर्व बाळासाहेबांचे शिवसैनिक फुटले आहेत. तू काय करु शकतो संजय राऊत? तुमचा एक कार्यकर्ता घुसला तर सर्व बंद करेल असं गुलाबराव पाटील म्हणाले.

अरे मी ३५ वर्षे बाळासाहेबांचा झेंडा घेऊन फिरलेला माणूस आहे. हा राऊत कधी कोणत्या आंदोलनात सहभागी झाला?”, असा सवालही यावेळी गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.