Home स्टोरी हिंदू धर्मातील देवाधर्मातील नियम तोडण्यात काही बायकाच प्रथम क्रमांकावर.

हिंदू धर्मातील देवाधर्मातील नियम तोडण्यात काही बायकाच प्रथम क्रमांकावर.

123

संपादकीय: महाराष्ट्र राज्यात अनेक मंदिरात मध्ये स्त्रियांना पोशाखाबाबत काही महत्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत. जसं की मंदिरात जाताना लहान कपडे घालून जाऊ नये, मंदिरात जाताना जीन्स पॅन्ट घालून जाऊ नये. अर्थात मंदिरात जाताना अगदी अंगभर कपड्याचा वापर करावा. काही मंदिरात  ‘मंदिरात यापुढे अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य किंवा अश्‍लील वस्त्रधारी तसेच ‘हाफ पॅन्ट बर्मुडाधारकांना’ मंदिरात प्रवेश नाही’, असा फलक मंदिर परिसरात लावला असून त्यावर ‘कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा’, अशी विनंतीही या फलकाद्वारे मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात आली आहे. तरीपण हे सर्व नियम पाया खाली तुडवण्यात कोकणातील काही महिला पुढाकार घेत आहेत असे दिसून येत आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे माणगाव येथील दत्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्या ठिकाणी काही बायका मंदिर समितीने घालून दिलेले नियम  पायाखाली घालताना दिसत होत्या. अनेक बायका जीन्स पॅन्ट आणि शॉर्ट कपडे घालून मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या आणि त्यावर मंदिराच्या कमिटीचीद्वारे कोणतीही कारवाई होतांना दिसत नव्हती. आज आपण इतर धर्मांकडे बघितलं तर त्या धर्मातील बायका कार्यक्रमांच्या वेळी परिपूर्ण पोशाख घालून त्या ठिकाणी हजर असतात. पण आपण ज्या हिंदू धर्माला सर्वश्रेष्ठ समजतो असा हिंदू धर्मजो सर्वश्रेष्ठ आहे. त्या धर्मातील काही बायका मात्र चुकीचा पोशाख धारण करून हिंदू धर्मातील गुरुनी घालून दिलेले सर् तोडत तसेच सर्व नियम रस्त्यावर आणत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर विविध मंदिरात सर्व प्रकारचे सूचना बोर्ड लावून सुद्धा त्या सूचना बोर्डाकडे दुर्लक्ष करण्याच्या काम काही हिंदू धर्मातील बायका करत आहेत आणि त्याकडे प्रामुख्याने मंदिर समितीचा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. असंच म्हणावं लागेल. मग फक्त नियम आता बोर्डावरच राहणार काय ते नियम अमलात पण येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो. खरं तर आज प्रत्येक मंदिरामध्ये कपडे कोणत्या प्रकारचे घालावेत?याबाबत बोर्ड लावावा लागतो यापेक्षा वाईट गोष्ट किंवा लाजिरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही. हेही नाकारता येणार नाही. तरीपण हे सर्व दुर्दैवी आणि वाईट प्रकार थांबवण्यासाठी आता प्रत्येक मंदिर समितीने योग्य ती भूमिका बजावणे अति महत्त्वाचे झालेले आहे. ज्या प्रकारे ह्या काही महिला मंदिराचे नियम तोडत आहेत त्यांना योग्य ती जागा दाखवून देण्याचे काम मंदिर समितीने केले पाहिजे. असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. नियम फक्त बोर्डावर नको तर त्या नियमांची योग्य प्रकारे बजावणी होणे गरजेचे आहे असे भक्तांचे म्हणणं आहे.