रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी संगती सह्याद्रीचे या ग्रुपने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या संगती सह्याद्रीचे या ग्रुपच्या सदस्यांनी तोरणा आणि रायगड येथे साफसफाई मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत. त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठीच संगती सह्याद्रीचे या ग्रुपचे सदस्य राज्यभरात या संवर्धनाचे काम करीत आहेत. या परिवाराचे सदस्य रत्नागिरीत दाखल झाले होते.

संगती सह्याद्रीचे ग्रुपच्या वतीने किल्ले तोरणा आणि रायगड येथील संपूर्ण परिसर बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून संगती सह्याद्रीचे या ग्रुपच्या वतीने वेगवेगळे गड किल्ले साफ करण्याची मोहीम आखली जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या गडांचे महत्व नागरिकांना समजावून सांगत महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांचे रक्षण करणे, संवर्धन आणि साफसफाई करणे याबाबत जनजागृती करण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांवर फक्त भाष्य करणं आणि त्याचे राजकरण करण्याचे काम सध्या काही व्यक्ती नेतेमंडळी करत आहेत. तर गड, किल्ल्यांवर फक्त भाष्य करणं आणि त्याचे राजकरण न करता या गड, किल्ल्यांवर जाऊन या गड, किल्ल्यांचे संवर्धन कसे करता येईल? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली ही अनमोल देणगी कशी जपता येईल? याकडे आता लक्ष देणे आणि त्यानुसार आजच्या युवाकांनी कार्यरत होणे ही काळाची गरज आहे. असा संदेश संगती सह्याद्रीचे ग्रुपच्या सभासदांनी दिला आहे.

यावेळी अमित गावडे, विश्वनाथ, संदीप, राघव, संतोष, सुनील परब, श्रीकांत, रामचंद्र राऊळ, आनंद सर, सुधीर परब, सुमीत वीर, मोतीराम, नारायण, मानस वारके, रमाकांत राऊळ, दीपक सर, किशोर गावडे, समीर हरड, संतोष तोंडीलकर, महेश लाड, कु. वेदांत दिपक गावडे, अमित शिरोडकर, मंदार साखळकर, किरण भोईर, विल्सन बोरकर, अमृत शेट्टी, श्रीनिवास राऊळ, लक्ष्मण गावडे, आनंद गावडे, दिपक गावडे हे सहभागी होते