३ एप्रिल वार्ता: लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ मंजूर करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात २८८ मतं आणि विरोधात २३२ मतं पडलीत. त्यामुळे लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी २ एप्रिल लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. हे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होत असताना मोठा गोंधळ झाला. काल दुपारी १२ वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशीरापर्यंत मोठा गोंधळ सुरु होता. अखेर वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात २८८ मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. या विधेयकात वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनेक तरतुदी आहेत. केंद्रीय वक्फ परिषदेत बिगर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि महिला प्रतिनिधीत्व वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. जमिनीच्या वादांचे निराकरण जलद करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
वक्फ विधेयकात पुढील दुरुस्ती करण्यात आल्या आहेत.
१) वक्फ बोर्डावर आधी मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होते. पण सुधारित विधेयकानुसार गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आले आहे.
२)वक्फ बोर्डावर आधी सरकारकडून चार सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती, तर चार सदस्य निवडून येत होते.
३) आता वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकानुसार ८ सदस्यांमध्ये किमान २ सदस्या गैर मुस्लिम असतील.
४)आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम होता, त्याला कोर्टात आव्हान देता येत नव्हते. पण सुधारणा विधेयकानुसार, वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे.
५) मशीद असेली जमीन किंवा मुस्लीम धर्म कार्यासाठी वाप होणाऱ्या वस्तूवर वक्फ बोर्डाचा दावा असायचा. पण आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही.
६) मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार आधी आयुक्ता होते. पण आता नव्या विधेयकानुसार, जिल्हाधिकारी वफ्कच्या जमिनीचे सर्वेक्षण करतील.
७) वादग्रस्त जमिनीचा ताबा वाद मिटेपर्यंत सरकारकडे राहणार आहे.
वक्फ कायदा म्हणजे काय?
वक्फ कायदा, १९९५ वक्फ संस्थांना नियंत्रित करतो आणि वक्फ मालमत्तेशी संबंधित तरतुदी, त्यांचे संरक्षण व्यवस्थापन, अतिक्रमण काढून टाकणे बेकायदेशीरपणे प्रतिबंधित करणे आणि व्यवस्थापन, विश्वस्तांची नियुक्ती किंवा काढून टाकणे, मुतवल्ली इत्यादी योजना आणि नियमांची तरतूद करतो.
वक्फ कायदा भारतात कोणीव केव्हा सुरु केला?
१२ व्या शतकात जेव्हा मुस्लिम आक्रमक मुहम्मद घोरीने मूळ हिंदू राजा पृथ्वीराज चौहानवर विजय मिळवल्यानंतर भारतात मुस्लिम राज्य आणि रेकॉर्ड केलेल्या अनुदानाद्वारे दोन गावांसह वक्फ स्थापन केला तेव्हा भारतीय उपखंडात पहिला वक्फ दस्तऐवजीकरण करण्यात आला.
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ मंजूर झाल्यामुळे भाजप सरकारची प्रशंसा होत आहे. तसेच लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ मंजूर होणे हा एक ऐतिहासिक विजय हि मानला जात आहे. भाजप सरकारच्या कलावधित आता लवकरच समान नागरिकत्व कायदा हि लागू होईल अशी चर्चा होत आहे.