Home राजकारण राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार!

राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार!

124

३० जून वार्ता: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रीमंडळाचा विस्तार आणि काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं विलंब झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. भरत गोगवले, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, बच्चू कडू, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील शिवसेनेच्या या आमदारांना मंत्रिपद मिळण्यची शक्यता आहे.