रत्नागिरी: रत्नागिरी गोहत्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे हे आक्रमक झाले असून गुन्हेगारांवर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी माल गाडीतून एका गायीचे तोंडाचा भाग रस्त्यावर पडल्याने एकच खळबळ उडाली.रस्त्यात पडलेल्या गाई च्या तोंडावरून रत्नागिरीत गो हत्या होत असल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे गो वंशरक्षक यांनी प्रशासनला जा विचारून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आता या प्रकरणी भाजपचे पदाधिकारी व माजी खासदार निलेश राणे यांनी आपली भूमिका मांडत प्रशासनने दोशींवर वेळीच कारवाई करावी अन्यथा आपणाला कायदा हातात घेऊनज्या वाहनाने अशा प्रकारची वाहतूक होते ते रोखून वाहनांची तोडफोड करू आणि ज्या ठिकाणी गो हत्या होते त्या ठिकाणचे सर्व अड्डे उध्वस्त करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.