Home स्टोरी मुलांच्या भवितव्यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे अत्यंत महत्त्वाचे:- केतन सावंत विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष

मुलांच्या भवितव्यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे अत्यंत महत्त्वाचे:- केतन सावंत विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष

193

सावंतवाडी प्रतिनिधी: आज होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस संदर्भात उपोषणाला मनसे विद्यार्थी सेनेचा पाठिंबा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत यांनी दिली. टर्मिनस मुळे भविष्यात मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. येण्या-जाण्यासाठी रेल्वे थांबा भेटला तर सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग च्या मुलांना सोयीस्कर होऊ शकतं. त्यामुळे रेल्वे टर्मिनस ची गरज आहे आणि याचा जास्त फायदा जिल्हातील विद्यार्थ्यांना होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपोषण स्थळी उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.