Home स्टोरी मला शिक्षक व्हायचं आहे, ही तुमची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा…!

मला शिक्षक व्हायचं आहे, ही तुमची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा…!

159

सावंतवाडी प्रतिनिधी:  बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये एआयने कब्जा केला आहे. परदेशात तंत्रज्ञानयुक्त शिक्षण प्रणाली ने जग व्यापून घेतल आहे. अशा या स्थितीत शिक्षक कालबाह्य होईल का? अशी भीती व्यक्त होत असताना . मला शिक्षक व्हायचं आहे. ही तुमची जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा.  आजच्या विद्यार्थ्यांना चौफेर ज्ञान देणारा गुणवंत टीचर चा शोध घेतला जात आहे. त्या शोधात मी असेन का याचा विचार करा. अन त्या ध्येयापर्यंत तुमचा प्रवास चालूच ठेवा. आपोआपच विद्यार्थ्यांच्या मनात घर करणारे टीचर अशी तुमची ओळख निर्माण होईल. त्यामुळे कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी शिक्षकाचं नातं हे अतूट राहील. तुम्ही बिनधास्तपणे तुमचं मार्गक्रमण करा. असे मत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना संवाद तरुण भारत चे सावंतवाडी प्रतिनिधी तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी व्यक्त केले. साळगाव येथील जय हिंद ग्रामोन्नती संस्था संचलित प्रमोद रवींद्र धुरी, अध्यापक महाविद्यालय मधील नवोदित छात्र शिक्षक स्वागत सोहळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवोदित छात्र शिक्षकाने आम्हाला शिक्षक व्हायचे आहे. हा निर्धार केला. अन बीएड शिक्षक कसा हवा? याचे धडे गिरवले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन करून  व सरस्वती मातेला पुष्प हार घालून प्रमुख पाहुणे. ॲड संतोष सावंत व लोकमान्य ट्रस्ट चे कोकण विभागीय एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  मयूर शार बिद्रे, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य अमेय महाजन आधी उपस्थित होते.

विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ॲड. संतोष सावंत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ॲड सावंत पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणाची सर्व दालने खुली असायला हवीत. हा दृष्टिकोन ठेवून लोकमान्य एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी बीएड महाविद्यालया सुरू केले आहे. गेल्या 2013 पासून आजतागायत अनेक आदर्श गुणवंत शिक्षक निर्माण झाले आहेत. हीच खरी या महाविद्यालयाची ओळख आहे. तुम्ही आज शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. मला शिक्षक व्हायचे आहे. मग तुम्ही आता एक शपथ घ्या. मला फक्त सर्टिफिकेट धारक शिक्षक बनायचे नाही. तर आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात घर करणारा गुणवंत शिक्षक टीचर व्हायचं आहे. त्यासाठी मी चौफेर ज्ञानाची शिदोरी आत्मसात कशी करता येईल या दृष्टीने सातत्याने माझे प्रयत्न राहतील. आज प्रत्येक जण शिक्षकाच्या पगारावर बोलतो आहे. शिक्षकाचा पगार किती आहे. यापेक्षा तो आपल्या देशाचा आदर्श नागरिक घडवून तो आहे. गुणवंत पिढी शिक्षकामुळेच निर्माण होत आहे याचा विसर पडू लागला आहे. शिक्षक हा खऱ्या अर्थाने समाजाचा मार्गदर्शक आरसा आहे. हे कायम लक्षात ठेवा आणि तुमचा हा शिक्षक बनण्याचा प्रवास उत्तम प्रकारे मार्गक्रमण करा. तुम्हाला कसलीच भीती नाही. जग कितीही बदलू तंत्रज्ञानाने जग सगळं व्यापून घेतला. ए आय ने शिक्षण सेवा दिली तरी गुणवंत शिक्षक प्रत्येकाला हवा आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील काळात भवितव्य आहे. चिंता करू नका या महाविद्यालयाचे नाव अजरामर करा असे ते म्हणाले.

अध्यक्ष स्थानावरून लोकमान्य एज्युकेशन ट्रस्टचे एक्झिक्यूटिव्ह श्री केळुस्कर म्हणाले या महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी गेल्या कित्येक कालावधीपासून येथील गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना श्रीमंत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. श्रीमंतांची मुले कुठेही प्रवेश घेऊ शकतात. पण या महाविद्यालयात सर्वसामान्य गोरगरिबांना प्रथम स्थान आणि त्यांना मदतीचा हात दिला. जात आहे. हीच खरी ठेव आहे. शिक्षक हा शिल्पकार असतो आणि तुम्ही समाजाचे खरे शिल्पकार आहात. या महाविद्यालयात तुम्हाला दोन वर्षा सर्वकाही शिकता येणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही सर्टिफिकेट धारक शिक्षक झाल्यानंतर समाजात करता येणार आहे. तुम्ही सातत्याने आदर्श समाज असा घडेल. या दृष्टीने तुम्ही विचार करायला हवा. हे महाविद्यालय म्हणजे तुमचं हक्काचं घर आहे असं ते म्हणाले यावेळी प्राचार्य डॉ शार विद्रे यांनी या नव्या छात्र शिक्षकांना तुम्ही येथे पदवी व व पदवित्तर शिक्षण पूर्ण करून आला. आहात पण तुमची पाटी येथे कोरी असायला हवी. तर आपसूकच तुम्हाला मी लिहिते बनले पाहिजे. शिक्षकाने शीलवान कर्तुत्ववान असायला हवे असे ते म्हणाले. यावेळी बीएडच्या या विद्यार्थ्यांनी आज पहिला धडा गिरवला. यावेळी श्रुती वेतुरेकर व सुमिता देसाई यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अवधूत य जरे . तर आभार प्रा अजित मसुरकर यांनी मानले. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा ऋषिकेश जाधव. प्रा दिपाली गाड प्रा मनोज सर बळ कर. यांनी सहकार्य केले यावेळी मोठ्या संख्येने छात्र उपस्थित होते.