Home स्टोरी पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्याचे शिवरायांचे होते ध्येय..! अँड शिवाजी देसाई यांचे...

पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्याचे शिवरायांचे होते ध्येय..! अँड शिवाजी देसाई यांचे अँड उदय भेंब्रे यांना प्रत्युत्तर.

52

गोवा (वाळपई): पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून गोवा स स्वतंत्र करण्यासाठी छत्रपती शिवराय आणि आणि त्यांचे सुपुत्र शंभूराजे यांनी प्रचंड मोठे प्रयत्न केले.. शिवरायांचे ध्येय आणि उद्दिष्ट हे पोर्तुगीज राजवटीतून गोवा पूर्णपणे मुक्त करण्याचे होते जर शिवराय जिवंत असते तर गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून तेव्हाच मुक्त झाला असता असे खणखणीत प्रत्युत्तर गोव्यातील नामवंत शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांनी लेखक उदय भेंब्रे यांनी शिवरायांच्या गोव्यातील एकूण इतिहासाविषयी प्रसारित केलेल्या वक्तव्या संदर्भात दिले आहे . सद्या उदय भेंब्रे त्यांच्या वक्तव्यामुळे गोव्यात प्रचंड असंतोष शिवभक्तामध्ये पसरला आहे. गोव्याशी शिवाजी महाराजांचा काय संबंध? असे वक्तव्य करून उदय भेंब्रे यांचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामुळे गोव्यातील शिवप्रेमींकडून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. अँड शिवाजी देसाई यांनी पुढे सांगितले की खरं म्हणजे या प्रयत्नांमुळेच गोवा स्वातंत्र्यलढ्याला तसं पाहायला गेलं तर एक वेगळी दिशा प्राप्त झाली.

संन १६६७ साली शिवरायांनी बारदेश वर जी स्वारी केली ती मुळात गोमंतकातील हिंदूंचे ख्रिस्तीकरण यावेळी शिवरायांनी कोलवाळ चा किल्ला अनेक पोर्तुगीजांना बंदिस्त गोमंतकात मोठ्या प्रमाणात ख्रिस्तीकरण करण्याचे मनसुबे यामुळे पोर्तुगीजांचे धुळीला मिळाले. पोर्तुगीजांचा भीषण पराभव आणि यामुळेच पोर्तुगीजांना शिवरायांच्या बरोबर तह करावा लागला. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की तह हा पोर्तुगीजांना शिवरायांच्या बरोबर करावा लागला.पोर्तुगीज शिवराय आणि शंभूराजे यांना वचकून असायचे. स्वराज्यात आरमार असायला हवी हे शिवरायांना मनोमन वाटायचे. पोर्तुगीजांकडे तसं पाहायला गेलं तर त्या कालखंडात प्रचंड प्रमाणात आरमार होत्या. आणि त्या बनवण्यासाठी त्यांच्याकडे तसे कारागीर देखील होते. एक प्रकारे बघायला गेलं तर समुद्रावर पोर्तुगीजांची एक वेगळीच रहदारी त्या कालखंडात होती. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर शिवरायांनी त्यांच्या मनात जो आरमार बनविण्याचा विचार आला होता तो आपल्या मावळ्यांना बोलून दाखविला. आणि स्वराज्यात नौदल असायला हवे यासाठी निश्चित धोरण तयार केले. आरमार बनविण्याची महारत पोर्तुगीजांकडे होती. लुई लेताव ह्या पोर्तुगीज कारागीराकडे शिवरायांनी आरमार बनविण्याची जबाबदारी दिली. आणि त्याच्यासोबत शिवरायांचे मावळे कामाला दिले. परंतु लुई लेताव याने हे काम अर्धवट केले.कारण त्याच्या राजाने ते काम सोडून येण्याचा त्याला पोर्तुगाल हून संदेश पाठवला. आणि त्यांनी सोडलेले अर्धवट काम शिवरायांच्या मावळ्यांनी पूर्ण केले. मदत मात्र सुरुवातीला पोर्तुगीजांची घेतली कारण एक ना एक दिवस हेच आरमार शिवराय यांच्या विरोधात वापरणार होते आणि तसा त्यांचा निर्धार होता. शिवरायांनी नोव्हेंबर १९६४ च्या दरम्यान सिंधुदुर्गातील समुद्रात असणारा मालवण किल्ला बांधण्यास प्रारंभ केला. तत्पूर्वी आदिलशाही सरदार खवासखान कुडाळ प्रांत घेण्यासाठी चालून आला होता. त्याचा पराभव शिवरायांनी केला. आणि त्यामुळे शिवरायांची प्रचंड दहशत आदिलशाही सत्तेवर बसली. आणि याच कारणाने गोव्यातील सत्तरी डिचोली पेडणे शिवरायांच्या ताब्यात आले. शिवरायांच्या ताब्यात या भागातील व्यापार आला.शिवराय सत्तरी आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या भिमगड या गडावर पोचले. पोर्तुगीज आणि शिवराय यांच्यात मुरगाव समुद्र भागात लढाई झाली ही लढाई नोदलांची होती. शिवरायांनी गोव्यासाठी धान्य घेऊन येणाऱ्या पोर्तुगीज जहाजाना अडविण्याचा प्रयत्न केला. शिवरायांनी पोर्तुगिजां बाबत व्यापार नीती आखली. पोर्तुगिजच्या मिठाच्या व्यापाराला कर लावला. आणि त्यामुळे विशेष करून भारत देश भागात मीठ स्वस्त दरात लोकांना उपलब्ध व्हायला लागले. पोर्तुगीजांनी तत्पूर्वी १५४० च्या दरम्यान दिवाडी बेटावरील सप्तकोटेश्वर मंदिर उध्वस्त केले होते. सूर्यराव देसाई यांनी या सप्तकोटेश्वर मंदिराचे शिवलिंग एका विहिरीच्या काठावर मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर बसवण्यात आले होते ते शिवलिंग डिचोली भागातील हिंदले या गावात आणले. आणि मग या गावचे नामकरण नार्वे असे करण्यात आले. सन १६६८ मध्ये शिवरायांनी सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधण्यास नार्वे येथे प्रारंभ केला. आणि गोव्यात संस्कृतीचे पूनुरुज्जीवन करण्यास प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांनी सप्तकोटेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केल्याच्या प्रसंगाचे वर्णन त्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेल्या संस्कृत शिलालेखात आहे. पोर्तुगीजाना गोव्यातून हाकलून देण्याच्या प्रयत्नात सप्तकोटेश्वर मंदिर निर्मितीची प्रक्रिया एक भाग होता. कोणताही व्यक्ती स्वतःचा ताबा असल्याशिवाय त्या जमिनीवर मंदिर बांधू शकत नाही हे वास्तव आहे आणि ते बांधायला पुष्कळ वेळ लागतो हे आपण इतिहास वाचताना लक्षात ठेवले पाहिजे. त्या कालखंडात मराठ्यांच्या आणि पोर्तुगीजांच्या सीमा या देखील ठरलेल्या होत्या.. शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी गोव्यातील नारायण शेणवी ही व्यक्ती उपस्थित होती. ही व्यक्ती त्यावेळी पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याकडे दुभाषी म्हणून काम करत होती. आणि तस बघायला गेलो तर स्वराज्यातील भाषा या व्यक्तीला अवगत होती. आणि त्यामुळे या व्यक्तीची मदत पोर्तुगीज आणि इंग्रजाना शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी झालेल्या तपशिलाच्या नोंदी ठेवण्यास झाली असेल. शिवरायांनी फोंडा महाल हा राज्याभिषेकाच्या पूर्वी १६६६ मध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी फोंडा महाल आदिलशाहीकडून ताब्यात घेण्यासाठी मोहीम आखली. आणि तो साल होता १६७५. यावेळी शिवरायांनी आदिलशाहीचा पराभव केला आणि किल्ला ताब्यात घेतला. फोंडा प्रांतातील अनेक भाग शिवरायांच्या ताब्यात आले.शिवरायांनी संपूर्ण गोवा ताब्यात घेण्याचा बेत आखला.पण एकाच वेळी अनेक शत्रू विरोधात लढायचे नाही असे धोरण शिवरायांचे होते.शिवरायांनी सन १६७९ साली बेतुलच किल्ला उभारला. पोर्तुगीज अधिकारी छत्रपती शिवरायांना नेहमी वचकून होते. पोर्तुगीजांना छत्रपती शिवराय हे नंबर एकचा शत्रू वाटत होते. पोर्तुगीजांनी शिवरायांच्या बरोबर मोठे समर प्रसंग टाळले.