Home स्टोरी गेल्या ५ वर्षात कणकवली नगरपंचातीच्या कामांत मोठा भ्रष्ट्राचार! जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

गेल्या ५ वर्षात कणकवली नगरपंचातीच्या कामांत मोठा भ्रष्ट्राचार! जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

105

कणकवली: कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यानी सुलभ शौचालयाच्या कामांत मोठा भ्रष्टाचार केला आहे. ८०० स्क्वेअर फुटची प्लिंथ आहे, साईटवर ती मापे मोजून आलो आहे. सुलभ शौचालयाचे ८६ लाखांचे अंदाजपत्रक केलं आहे. त्या बांधकामाचा सरासरी १० हजार ७५० रुपये स्क्वेअर फूट दर होत आहे. आता घर बांधायला दिले तर २ हजार रुपये स्क्वेअर फूट मध्ये होत आहे. मात्र, गेल्या ५ वर्षात कणकवली नगरपंचातीच्या सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर, राष्ट्रवादीचे निखिल गोवेकर, उपाध्यक्ष रुपेश जाधव, जयेश धुमाळे आदी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतची ५ वर्ष सर्वच नगरसेवकांची पूर्ण झाली आहे. शेवटच्या सभेत सभागृहात भ्रष्टाचार काल काढला, बसुलभ शौचालयाच्या कामासाठी केलेले अंदाजपत्रक बोगस आहे, डीएसार प्रमाणे रेट देण्याची आवश्यकता आहे. मात्र, सत्ताधारी लोकांनी मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कणकवलीत चांगलं कोणतेही काम झालं नाही. १७२ नव्हे तर ३०० कामे मार्गी लागली असतील. ही कामे १० लाख रुपये किंमतीची २० लाख दराने केली आहेत, असा आरोप सुशांत नाईक यांनी केला.

कणकवली नगरपंचायत मध्ये गेल्या ५ वर्षात मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. आ.नितेश राणे यांना हा भ्रष्ट्राचार तुम्हाला कळायला दिलाच नाही. नाहीतर देवगड प्रमाणे हिस्सा मागितला असता, म्हणून तुमचीही फसवणूक झाली आहे.आमदार नितेश राणे म्हणाले कणकवली नगरपंचायत मध्ये पारदर्शक कारभार केला. मात्र, त्यांनी केलेली कामे आणि खर्च पहावा, असे सुशांत नाईक यांनी सांगितले. रविंद्र मुसळे मृत्यू प्रकरणी हे सत्ताधारी ठेकेदाराच्या पाठीशी राहिले आहेत. या शहरातील कामांची आमदार आणि खासदार यांच्याकडे चौकशी करण्यासाठी मागणी करणार आहोत, असे श्री. नाईक यांनी सांगितले. ए. जी. डॉटर्स कंपनीला नगरपंचायतने कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी काम दिलं ते ५०० कोटींचे कर्ज घेणार होते. त्यात ५० कोटी भाजपा आ. नितेश राणे यांना मिळणार होते. मात्र आम्ही आवाज उठल्यामुळे तो प्रकल्प होवू शकला नाही. त्या बोगस प्रकल्प होवू दिला नाही. सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवला आहे. यापुढील काळात महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत, असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.पुढे बोलताना कन्हैया पारकर म्हणाले, कणकवली नगरपंचायत शहरात गेल्या ५ वर्षात जी कामे झाली आहेत. तिथे कामाचे नाव आणि किती रुपयांचे काम तो एक महिन्यात बोर्ड लावावा, अन्यथा शिवसेना आणि महविकास आघाडी सर्व बोर्ड लावणार आहेत.

पुढे बोलताना काँगेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर म्हणाले, गेली १५ वर्षे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कणकवली नगरपंचायती सत्ता आहे. कोणतीही ठोस कामे शहरात झाली नाहीत. क्रीडांगण नाही ,कुठला विकास झाला नाही. राष्ट्रवादीचे निखिल गोवेकर म्हणाले, राष्ट्रवादी म्हणून महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहोत. नगरपंचायत सत्ताधारी लोकांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्ट्राचार केला आहे, त्या विरुद्ध आम्ही लढा देणार आहोत.असेही त्यांनी सांगितले.