कागल प्रतिनिधी: करवीर या दोन तालुक्यांना जोडण्यासाठी दुधगंगा नदीवरील बाचणी – वडशिवाले दरम्यान उभारत असलेल्या नवीन पुलाचे काम गेली ४ वर्षे रखडले आहे. या पुलाचे काम संबधित ठेकेदाराने तात्काळ सुरू करून हा नवीन पुल येत्या ६ महिन्यात वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख अशोक पाटील यानी दिला. व मागण्यांचे लेखी निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
निवेदनातील मजकूर असा बाचणी येथे जुन्या पुलाला पर्यायी पुल उभारणीसीठी महाराष्ट्र शासनाने सुमारे ४ कोटी रूपये मंजूर केले आहेत. जुन्या पुलाचे बांधकाम ८० वर्षापुर्वीचे आहे. सतत पाण्याच्या मा-याने पुलाला कांही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. शिवाय पुलावरील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.दरवर्षी हा पुल पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने गारगोटी- कोल्हापूर बाचणीमार्गे वाहतुक बंद होते. यंदा पावसाळ्यापुर्वी जुन्या पुलावरील रस्ता,कॅांक्रिटीकरण केला होता तोही पावसाने धुवून गेल्याने पुलावरून वाहतुक करणे धोकादायक झाले आहे. एसटी फे-याही बंद झाल्याने पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. तेव्हा संबधीत विभागाने लक्ष घालून जुन्या पुलाची दुरूस्ती व नवीन पुलाचे काम तात्काळ पुर्ण करावी अशी मागणी यावेळी शिवसेना ठिकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली. आजच्या या आंदोलामुळे पुलावरली दोन्ही बाजूची वाहतूक कांही वेळ थांबली होती दरम्यान कागल पोलिसांनी हस्तक्षेक करून आंदोलन स्थगीत करण्याचे आवाहन केले व वाहतुक पुर्ववत केली.
यावेळी डॅा.के.एम.पाटील,चंद्रकांत पाटील,निवृती पाटील,प्रकाश पाटील,यशवंत पाटील,जिवन कोळी,युवराज ससे,उत्तम पाटील,पिंटू गुरव,अरूण पाटील,विजय जाधव,अजित बोडके,किरण दळवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट… प्रशासनाला जाग येणार कधी….
शंभरीकडे वाटचाल करीत असलेल्या जुन्या जीर्ण पुलावरून सध्या धोकादायक स्थितीत वाहतुक सूरू आहे. येथील नवीन पुलाचे काम ४ वर्षे रखडल्यामुळे येथे मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार काय असा सवाल उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी उपस्थित केला.
फोटो ओळी – बाचणी ता.कागल येथे दुधगंगानदीवरील नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करताना संभाजी भोकरे,अशोक पाटील आदी शिवसैनिक. छायाचित्र ः सागर लोहार,साके