Home स्टोरी १० मार्च १९८६ राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद!

१० मार्च १९८६ राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद!

122

लेखक संदीप जगताप: हाच तो काळादिवस १९ मार्च १९८६ ज्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने चार मुलं , पत्नी सह आत्महत्या केली. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवली गेली.सगळं राज्य हळहळले. वाटलं होतं इथंच सगळं थांबल. पण पुढे असंख्य शेतकरी आत्महत्या होत राहिल्या. राजकीय नेत्यांना भाषणांसाठी फक्त नवं भागभांडवल मिळालं.पण आजपर्यंत यावर कुठलंही सरकार काहीही करू शकले नाही. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी होत चाललाय..शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकरीच थांबवू शकतात. फक्त एकमेकाला साथ द्या.

लेखक संदीप जगताप

पुढील विचार ठेवा – पुन्हा पेरू…!!

तेल संपलं वात जळाली समई आहे ना ..पुन्हा पेटवू …! सावरा तोल स्वतः अनमोलआयुष्य आहे ना.. पुन्हा चेतवू…! एक वादळ .. एक खड्डा छाती आहे ना .. अंधार चिरु…! पिकं सडली हंगाम गेला माती आहे ना .. पुन्हा पेरू…!!

संदीप जगताप – मो न 7218625960