Home स्टोरी सह्याद्री फाउंडेशनची सुदृढ बालक स्पर्धा उत्साहात संपन्न…!

सह्याद्री फाउंडेशनची सुदृढ बालक स्पर्धा उत्साहात संपन्न…!

155

सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सव २०२४ च्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत. पहिल्या गटात भार्गव दत्ताराम झोळंबेक, दुसऱ्या गटात विधी विक्रम मोरजकर, तिसऱ्या गटात वेदा देविदास राणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सह्याद्री फाउंडेशनने बाल सुदृढ स्पर्धा घेऊन खऱ्या अर्थाने लहानपणापासूनच कसे सुदृढ राहिला यासाठी पालकांना एक नवी सवय स्पर्धेच्या माध्यमातून लावून दिली आहे. आज समाजामध्ये डायबेटिसचे प्रमाण वाढत चालले आहे हे प्रमाण कमी करायचे असेल तर पालक व लहान मुलांमध्ये आहारा कडे विशेष लक्ष द्यायला हवे असे सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम सावंत यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आज रविवारी मान्सून महोत्सवानिमित्त सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन युवराज लखन सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेजचे डॉक्टर विशाल पाटील, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, आंबोली सैनिक स्कूलचे संचालक जॉय डॉनटस, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, बेबी वर्ड्स च्या संयोजका सौ. सुजल राऊळ.ळ, फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यप्रमुख एडवोकेट संतोष सावंत, सचिव प्रताप परब, खजिनदार हर्षवर्धन धारणकर, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, सैनिक स्कूलचे प्राचार्य नितीन गावडे, शशिकांत मोरजकर, गजानन बांदेकर, राजेश पास्ते आधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री. पाटील म्हणाले मोबाईल युग आले आहे. अमेरिकेमध्ये जो सर्वे केला आहे त्या सर्वे मध्ये सहा तास आज मोबाईलचा वापर प्रत्येक व्यक्ती करत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच घराघरात वाद विवाद आणि भांडणे आधी प्रकरही वाढत आहेत. आज पालक मुलांकडे मोबाईल देत आहेत. आपण मुलांकडे त्यांच्या आहाराबाबत लक्ष देतो परंतु त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांच्या शरीरावर मनावर आतापासूनच मोठा आघात करत आहोत आणि हेच खरे घातक आहे. आणि याकडे आता पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. मोबाईल पासून आपल्याला व मुलांचा बचाव करायला हवा असे ते म्हणाले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ व अध्यक्ष रवींद्र माडगावकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी आर्किटेक पदवी प्राप्त केल्याबद्दल ए एस राऊळ याचा गौरव करण्यात आला.. सुदृढ बालक स्पर्धेत जवळपास ७० हून अधिक मुलांनी जिल्हाभरातून भाग घेतला. स्पर्धेचा अधिकार प्रथम वयोगट एक ते पाच, प्रथम क्रमांक भार्गव दत्ताराम झोळंबेकर, सावंतवाडी दुतीय अंश योगेश शेटये, (कुंभ्रल), तृतीय अथर्व सतीश सांगेलकर ( शिरशिंगे) दुसऱ्या गटात पाच ते आठ प्रथम विधी विक्रम मोरजकर (सावंतवाडी) दुतीय दर्श जनार्धन चोडण कर,  तृतीय शौर्य नंदकुमार नरतवडेकर( सावंतवाडी) तिसऱ्या गटात आठ ते बारा प्रथम वेदा देविदास राणे, दृतिय श्रेया लाडजी राऊळ, तृतीय संस्कृती शैलेश सरमळकर यांनी पटकवला. या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण १९ ऑगस्टला बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता महोत्सव समारोप कार्यक्रमात केले जाणार आहे. परीक्षक म्हणून डॉक्टर विशाल पाटील यांनी काम पाहिले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आंबोली सैनिक स्कूल, सैनिक पतसंस्था, बेबी वर्ड्स या सर्व टीमने विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन प्राचार्य ऋषिकेश गावडे यांनी केले.