सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुन्हा एकदा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले दिपक केसरकर?
आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता, त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता. त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर आमचे मुख्यमंत्री चालत आहेत. हा राज्यात बदल घडला नसता तर युती पुन्हा आली नसती, आणि शिवसेना संपवण्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी झाला असता, असं शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.