सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा मेळावा लवकरच घेण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेतर्फे हा साहित्यिकांचा मेळावा घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जे साहित्यिक असतील त्यांनी आपली पुस्तके अथवा लेखन साहित्य येत्या 20 जून पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ येथील जिल्हा शाखेकडे जमा करावेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी दिली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा शाखेची कार्यकारणी बैठक घेण्यात आली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सचिव विठ्ठल कदम खजिनदार भरत गावडे, रूपाली काजरेकर, सुभाष गोवेकर, तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत, वृंदा कांबळी, सुरेश पवार आधी उपस्थित होते.
यावेळी जुलै महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा मेळावा घेण्याबाबतचे नियोजन करण्यात आले. हा मेळावा कुडाळ येथे घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांना एकत्र करून साहित्यिकांची देवाणघेवाण आणि त्यांचे साहित्य निर्मितीला एक दर्जा देण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजितकरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या साहित्यिकांकडे त्यांनी लिखाण केलेले पुस्तके अथवा काही साहित्य असेल तर त्याने आपली पुस्तके येत्या २० जून पर्यंत जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्याकडे सादर करावे. अथवा प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष यांच्याकडे १५ जून पर्यंत द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा शाखेतर्फे साहित्य लेखन कार्यशाळा घेण्यातही येणार आहे. वर्षभरात विविध उपक्रम घेण्याचे ही नियोजन करण्यात आले. कित्येक वर्षानंतर सावंतवाडी येथे जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी शाखेने उत्तम नियोजन करून यशस्वी केले. त्याबद्दल सावंतवाडी शाखेचा सर्व कार्यकारणी पदाधिकारी सदस्य यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. आधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.